नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील जयपूर शिवारात दुपारी 2 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असताना येथील अपार्णिका देवी मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा कळस तुटला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मंदिरावर कोसळलेल्या विजेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
या घटनेमुळे जयपूर येथील आगामी नवरात्रोत्सवाचे नियोजन विस्कटले असून, नवरात्रीपर्यंत मंदिर कलशाचे काम पूर्ण कसे करावे, अशी चिंता ग्रामस्थांमध्ये आहे. तसेच गावावरील अप्रिय संकट अपर्णिका देवीने आपल्याकडे ओढून घेत नैसर्गिक संकटापासून वाचविण्याचे काम केल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान झालेल्या पावसामुळे व वीज पडून अन्य परिसरात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसील विभागाकडून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा :
- पौड : जोरदार पावसामुळे उपनगरांत दाणादाण; राम नदीचे पाणी लोकवस्तीत
- Asia Cup 2022 : पाकिस्तान हारलं अफगाणिस्तान नाचलं! श्रीलंकेने आशिया चषक जिंकल्यानंतर जल्लोष
- रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या अधिक
The post नाशिक : मंदिरावर वीज कोसळून कळस जमीनदोस्त appeared first on पुढारी.