Site icon

हिंगोली: राहूल गांधी हे उज्वल भारताचे भवितव्य; कुणाल पाटील

धुळे, पुढारी वृत्तसेवा : खा.राहूल गांधी हे उज्वल भारताचे भवितव्य असून त्यांच्यासोबत चालताना प्रत्येक माणसाला उर्जा व नवा उत्साह मिळत असतो. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी निघालेल्या या यात्रेत सहभागी होताना एक सुवर्ण आणि ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता आले हे माझे भाग्यच आहे, असे आमदार कुणाल पाटील भारत जोडो यात्रेदरम्‍यान म्‍हणाले.

हिंगोली जिल्हयात निघालेल्या खा.राहूल गांधी यांच्यासोबत कुणाल पाटील यांनी भारत जोडो यात्रेत सामील झाले. खा.गांधी यांचे वाशिम जिल्हयात आगमत होत आहे. या जिल्हयातील दौरा नियोजनाची जबाबदारी कुणाल पाटील यांच्यावर होती. त्याअनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वाशिम जिल्हयातील पदाधिकार्‍यांसोबत कुणाल पाटील हे खा.राहुल गांधी यांचे वाशिम जिल्हयाच्या सिमेवर स्वागत केले.

हेही वाचा  

परभणी : चारठाणा येथील जीर्ण विद्युत ताराकडे महावितरणचे दुर्लक्ष

Eknath Shinde Jitendra Awhad : पोलीस योग्य ते कारवाई करतील; आव्हाडांवरील आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

वाकड चौकामध्ये सिग्नलशेजारी पाणीगळती

The post हिंगोली: राहूल गांधी हे उज्वल भारताचे भवितव्य; कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Exit mobile version