Chhagan Bhujbal : जयंतीच्या कार्यक्रमाला विरोध नाही पण पुुतळे हटविण्याची गरज नव्हती

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले असून छगन भुजबळ यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जयंतीच्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याची गरज नव्हती. ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेण-गोळे सहन करून मोठा त्याग केला व ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना. मला या लोकांच्या बुद्धीची कीव येते. अहो आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

याच इमारतीत चांगला ऑडिटोरियम आहे, तिथे कार्यक्रम घेता आला असता. पण पुतळे हटवून कार्यक्रम करण्याची गरज नव्हती.  या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी आहे.  महाराष्ट्र सरकारने या घटनेची चौकशी करावी असे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा :

The post Chhagan Bhujbal : जयंतीच्या कार्यक्रमाला विरोध नाही पण पुुतळे हटविण्याची गरज नव्हती appeared first on पुढारी.