नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेले नुकसान मोठे असून हताश हाेत धीर सोडू नका. आपल्याला पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सरकार आपल्याला पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधित शेतकऱ्यांना दिली.
गारपिटीने नुकसान झालेल्या सटाणा तालुक्यातील लखमापूर शिवारात सोमवारी (दि. १०) बावनकुळे यांनी पाहणी केली. अवकाळीने नुकसान झालेले द्राक्ष, कांदा, गहू, मका, डाळिंबासह अन्य पिकांची पाहणी करताना काही शेतकऱ्यांनी बावनकुळे यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी तातडीने प्रक्रियेची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेताना सरकारकडून तातडीने मदत मिळवून देण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांना निराश होऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी भाजपचे प्रदेश व स्थानिक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा :
- नाशिक : शेतपिकांची पाहणी करत खासदार गोडसे यांचे मदतीचे आश्वासन
- सिंगापूर आशियातील सर्वात सुंदर देश: काय आहे येथे खास, जाणून घ्या ( web story)
- बाळासाहेबांचा अनादर केलेला नाही : चंद्रकांत पाटील
The post Nashik : शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका : बावनकुळे appeared first on पुढारी.