नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर व जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागला. नाशिकचे किमान तापमान 13.2 तर निफाडचे 10.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
मंगळवारच्या तुलनेत तापमानात कमालीची घट दिसून आली. शहरात दिवसभर उन्हाची तिव्रता कमी असल्याने हवेत गारवा होता. आजही नाशिकमध्ये प्रचंड गारवा आहे. या थंडीमुळे मानवी आरोग्यावर कमालीचा परिणाम झालेला दिसून येत आहे.
जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार असून गहू, हरभरा, कांद्याबरोबरच रब्बीच्या पिकांना हे वातावरण पोषक ठरणार आहे. मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान १४-१५ डिग्री तर कमाल तापमान २६-२९ डिग्री दरम्यान जाणवत असुन ही दोन्ही तापमाने सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने खालावलेली आहेत. त्यामुळे नववर्षात महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतांनाच मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. हा प्रभाव उत्तर भारतातील थंडी राजस्थान गुजराथ मार्गे कोकणात उतरत आहे.
हेही वाचा :
- Angarki Chaturthi : अंगारकीसाठी सिद्धिविनायक मंदिरात जय्यत तयारी, सोमवारी मध्यरात्रीपासून मंदिर दर्शनासाठी खुले
- बेळगाव : यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ६ ठार, १६ जखमी
- पुणे : विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीचा विनयभंग
The post Nashik weather : थंडगार वाऱ्यांनी नाशिककर गारठले appeared first on पुढारी.