नाशिक (मुल्हेर) : पुढारी वृत्तसेवा
शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मुल्हेरसह परिसरातील शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. जाखोड येथे वीज पडून दादाजी अभिमन पवार यांचा बैल मृत्यूमुखी पडला. तर वादळी वार्याने झाड उन्मळून दादाजी भावडू पवार यांच्या घराचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला गहु, हरबरा, कांदा पिक झाकून ठेवण्यासाठी शेतकर्यांची धावपळ उडाली. यंदा महिनाभरापासून सातत्याने पडणार्या अवकाळी पावसामुळे जगायच कसं अशी हताश प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा:
- भल्लालदेवचा मुकुट घालून शालू आली भेटीला…
- Air India flight : विमानात प्रवाशाने केला केबिन क्रूवर हल्ला, विमान पुन्हा दिल्लीला परतले!
- नगर : पावसाने शेतकर्यांवर ‘अवकळा’
The post नाशिक : जाखोडला वीज पडून बैल ठार appeared first on पुढारी.