नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ७२९ हेक्टरचे नुकसान, १०७ गावांना तडाखा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात सोमवारी (दि. १५) वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल १०७ गावांमधील ७२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. त्यामुळे ३ हजार ५१८ शेतकरी बाधित झाले आहेत. सुरगाण्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून, ५०२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये एकीकडे उष्णतेची लाट पसरली असून, पाऱ्याने चाळिशी …