११,४४७ कृषिनिविष्ठा केंद्रावर कारवाई, ३४ लाखांचा बोगस माल जप्त
नाशिक पुढारी वृत्तसेवा- गत वर्षभरात जिल्ह्यामधील साडेअकरा हजार कृषिनिविष्ठा केंद्रांची तपासणी करत कृषिविभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने तब्बल ३४ लाखांची बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा साठा जप्त केलेला आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने शेतकऱ्यांना सावध राहून खते, बियाणे खरेदी करण्याचे तसेच बोगस बियाणांची विक्री कुठे होत असेल, तर तत्काळ माहिती देण्याचेही आवाहन केले आहे. …