जळगाव; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. आज शनिवारी (दि.१५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरासह परिसरात अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची ताराबाळ उडाली. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
जळगाव जिल्ह्यातील काही भागात दुपारपासूनचं ढगाळ वातावरण होते. सायंकाळी भुसावळ शहरासह परिसरात जोरदार वारा सुटला. यानंतर पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे मात्र नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तापमानात घट…
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला आहे. मागील दोन दिवसापूर्वी राज्यातील सर्वाधिक ४४ हुन अधिक तापमान नोंदविल्या गेलेल्या भुसावळात आज ४१.१ अंश इतके तापमान नोंदविले गेले. गेल्या सहा दिवसांत भुसावळ शहराचे तापमान वाढले होते मात्र आज ढगाळ वातावरणामुळे तापमान ३.३ अंशाने घसरून ४१.१ अंशांवर पोहोचले.
जिल्ह्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या आठवडाभरपसून भुसावळ शहराचा पारा बुधवारी तब्बल ४४ अंशावर नोंदवण्यात आल्यानंतर शुक्रवारीदेखील पुन्हा पारा ४३.३ अंशावर पोहोचला होता. आज शनिवारी ढगांनी गर्दी केल्यामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. काही दिवसापूर्वी राज्यातील सार्वधिक तापमान असलेल्या भुसावळातील तापमानात देखील घसरण झाली आहे. यामुळे नागरिकांना उकड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा;
- Maherchi Sari : ‘माहेरची साडी’नंतर तब्बल ३० वर्षांनी ‘लेक असावी तर अशी’…
- Kharge Calls Kejriwal : सीबीआय चौकशीच्या आधी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली केजरीवाल यांच्याशी चर्चा
- पलक तिवारीच्या बोल्ड स्टाईलने वाढला इंटरनेटचा पारा, फोटो पाहून चाहते झाले वेडे
The post जळगाव : भुसावळ तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी; तापमान घटल्याने नागरिकांना दिलासा appeared first on पुढारी.