नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत “आरआरआर’ केंद्र

आरआरआर केंद्र,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर (कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केंद्र – आरआरआर) स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा या मोहिमांच्या अंतर्गत मनपाच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये आरआरआर केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत.

मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथेही नुकतीच आरआरआर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत नाशिक शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते, की आपल्याकडील निरुपयोगी वस्तू उदा. कपडे, पादत्राणे, भांडी, पुस्तके, प्लास्टिकच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, स्टेशनरी आदी प्रकारच्या वस्तू मनपाच्या आरआरआर केंद्रांत जमा कराव्यात. जेणेकरून कचऱ्याची निर्मिती कमी होईल, कचऱ्याचा पुनर्वापर होईल किंवा कचऱ्यापासून नवीन वस्तू तयार केल्या जातील. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत "आरआरआर' केंद्र appeared first on पुढारी.