
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहतीतील नव्याने डागडुजी करण्यात आलेल्या रस्त्यांवर कच पसरविण्यात आल्याने, सोयीपेक्षा गैरसोयच अधिक झाल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून केल्या जात होत्या. कचवरून वाहने चालविताना अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्याने, प्रशासनाने तत्काळ कच हटवावी, अशी मागणी केली जात होती. अखेर प्रशासनाने कच हटविण्यास सुरुवात केल्याने वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा सर्कलपासून ते सीएट कंपनीपर्यंत रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, रस्त्यावर पसरविलेली कच जशीच्या तशी ठेवल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने चालविताना अक्षरश: कसरत करावी लागली. वाहने घसरल्याने, अपघाताच्या घटनाही समोर येऊ लागल्या. महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने याप्रकरणी लक्ष घालून तत्काळ रस्त्यावरील कच हटवावी, अशी मागणी होत होती. अखेर उशिरा का होईना, प्रशासनाने कच हटविण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती.
हेही वाचा :
- पिंपरी : जलपर्णी कायमची नष्ट करणार ; पर्यावरण विभागाचा दावा
- Tunisha Sharma Death case | शीझान खान सेटवर नशा करत होता; तुनिषाच्या आईचा धक्कादायक खुलासा
- पिंपरी : जलपर्णी कायमची नष्ट करणार ; पर्यावरण विभागाचा दावा
The post नाशिक : एमआयडीसी रस्त्यांवरील कच अखेर हटविली appeared first on पुढारी.