जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे मूळ लाभार्थी हे घरकुलापासून वंचित असून, योजनेच्या चौकशीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
रावेर आणि यावल तालुक्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आरपीआयने केला आहे. यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. या योजनेपासून लाभार्थी वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मिळावे व भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली व बोंबाबोंब आंदोलन केले. दरम्यान, तत्काळ मागणी मान्य न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयावर चढून आत आंदोलन करण्याचा इशारा राजू सूर्यवंशी यांनी दिला आहे.
हेही वाचा:
- आटपाडी : आवळाईत विना परवाना बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; ग्रामस्थांत नाराजी
- नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध
- पुणे: आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हेमंत रासने यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
The post जळगाव : रिपाइंतर्फे जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.