तेरावा वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये जळगाव तर मुलींमध्ये पाचोरा प्रथम

जळगाव : जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरावा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या.

स्पर्धेत मुलांमध्ये जळगावचा क्षितिज वारके याने सात पैकी साडेसहा गुण घेत प्रथम क्रमांक मिळविला. दुसऱ्या स्थानी पाचोरा येथील आर्यकुमार शेवाळकर याने साडेपाच गुण घेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर तिसऱ्या स्थानी जळगावचा दुर्वेश कोळी याने दोन गुण घेत समाधानकारक कामगिरी केली.

मुलींमध्ये पाचोरा येथील ऋतुजा बालपांडे याने पाच गुण घेत प्रथम क्रमांक मिळविला. दुसऱ्या स्थानी जळगावची विद्या बागुल याने चार गुण घेत द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेत एकूण ४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सात फेऱ्यांमध्ये झालेल्या स्पर्धेत पहिल्या १० विजेत्या खेळाडूंना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव संजय पाटील आणि नथू सोमवंशी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

विजेते खेळाडू खालीलप्रमाणे:

  • मुले: क्षितिज वारके (जळगाव), आर्यकुमार शेवाळकर (पाचोरा), दुर्वेश कोळी (जळगाव), आरुष सरोदे (जळगाव), शाश्वत संघवी (जळगाव), सम्यक निकम (जामनेर), गौरव बोरसे (जळगाव), गौरव जोशी (जळगाव), पार्थ नानकर (जळगाव), कृतार्थ शहा (जळगाव)
  • मुली: ऋतुजा बालपांडे (पाचोरा), विद्या बागुल (जळगाव), चेतना सोनवणे (पाचोरा), गार्गी राजपूत (चाळीसगाव)

उत्साहवर्धनार्थ अनुश्री पाटील आणि वीर आहूजा यांना गौरवण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या दोन मुले आणि मुली यांची निवड नाशिक येथे २० ते २२ ऑक्टोबरला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रवीण ठाकरे, परेश देशपांडे, नथू सोमवंशी आणि पवन अभिषेक जाधव यांनी काम पाहिले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

The post तेरावा वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये जळगाव तर मुलींमध्ये पाचोरा प्रथम appeared first on पुढारी.