नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजप विरोधामध्ये जो काही जनतेचा आक्रोश तयार होत आहे, त्याचा चेहरा म्हणजे नितीश कुमार असतील. देशभरामध्ये सीएए आणि एनआरसी या दोन्हीही कायद्यांच्या विरोधात ठराव करणारे पहिले राज्य बिहार असल्याचा दावा जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार कपिल पाटील यांनी केला.
नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता संवाद दौऱ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, सर्व छोट्या छोट्या जातींना त्यांच्या हक्काचे आणि सत्तेत वाटा मिळाला पाहिजे म्हणून जातीय जनगणना करणारे पहिले राज्य तेही बिहारच आहे. नितीश कुमार हे नुकतेच महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. त्यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही ते भेटले. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
या बैठकीत ॲड. शरद कोकाटे, प्रा. अर्जुन कोकाटे, राजेंद्र लोंढे, के. के. अहिरे, सुरेश सोनवणे, सोमनाथ गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीत जिल्हाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा :
- ..म्हणून गुवाहाटीला जावे लागले; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
- विकसित देश म्हणजे काय.. भारतासमोरील आव्हाने काय?
- आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे शिवसेनेची कसोटी
The post भाजपविरोधी एकजुटीचा चेहरा नितीश कुमार : आमदार कपिल पाटील यांचे प्रतिपादन appeared first on पुढारी.