जळगावात विषारी औषध पाजून तरुणाचा खून, चौघांना अटक

जळगाव खून,www.pudhari.news

जळगाव : जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करीत विषारी द्रव पाजून हत्या केल्याची घटना शहरातील हॉटेल जान्हवीजवळ रविवार, 11 रोजी घडली होती. या प्रकरणी चौघांविरोधात मंगळवारी रात्री उशिरा जळगाव एमआयडीसी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश रघुनाथ चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले की, जळगाव शहरातील हॉटेल जान्हवी जवळ जुन्या भांडणाचे कारणावरुन यातील आरोपी सचिन कैलास चव्हाण (वय २३), तुषार उर्फ सोन्या विजय पाटील (वय- २४) सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव (वय ३६), कुदंन रविंद्र पाटील (वय-३० सर्व रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) अशांनी कट कारस्थान करुन फिर्यादीचा मुलगा चेतन प्रकाश चौधरी (वय २३) यास जळगाव शहरतील प्रियंका किराणा जवळ जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन काहीतरी विषारी पदार्थ पाजले. चेतन यांच्यावर औषधोपचार दरम्यान तो मयत झाला. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघही संशयितांना अटक केली आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, सतीश गर्जे, इम्तियाज खान यांच्या पथकाने ही कारवाई केली.

The post जळगावात विषारी औषध पाजून तरुणाचा खून, चौघांना अटक appeared first on पुढारी.