नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड

जल

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सर्व नळधारकांची 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतची पाणीपट्टीची बिले वितरित केली असून, ती लवकरात लवकर भरण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने केले आहे. अन्यथा दि. 15 मेपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे, तरी पाणीपुरवठा कमी होत असून, कोणीही पंप किंवा मोटर लावताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा - कॅन्टोन्मेंट बोर्ड appeared first on पुढारी.