Jalgaon : जामनेर येथे वीज कोसळल्याने दहा मेंढ्यासह बकर्‍या ठार

वीज ,www.pudhari.news

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पावसासोबत वीज कोसळल्याने जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे ८ मेंढ्या आणि २ बकर्‍यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे नाशिक जिल्ह्यातील काही मेंढपाळांची टोळी आलेली आहे. हे मेंढपाळ परिसरातील रानावनात आपल्या मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जातात. पाऊस सुरू असल्याने मेंढ्या झाडाखाली होत्या. यावेळी शेतामधील लिंबाच्या झाडावर वीज पडल्यामुळे दहा मेंढ्या व दोन बकर्‍या ठार झाल्या. मात्र बाजूलाच असलेले मेंढपाळ सुखरूप बचावले आहेत. आपल्या डोळ्यात देखत मेंढरांचा मृत्यू झाल्याने या मेंढपाळांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

The post Jalgaon : जामनेर येथे वीज कोसळल्याने दहा मेंढ्यासह बकर्‍या ठार appeared first on पुढारी.