नाशिक : ‘अनकाई’वरील तलावात दोन जण बुडाले

बडून मृत्यू,www.pudhari.news

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
काही पर्यटक मंगळवारी (दि. 16) अनकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यात कोपरगाव येथील मिलिंद रवींद्र जाधव (20) आणि रोहित पिंटू राठोड (14, दोघे रा. धारणगाव रोड, कोपरगाव) हे पोहण्यासाठी अनकाई किल्ल्यावरील तळ्यात उतरले असता, पाण्याचा व तळ्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती इतर पर्यटकांनी गावातीलच रमजान सय्यद यांना दिली. त्यावर पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी गावातील ग्रामरक्षक दलातील तरुणांच्या साह्याने या दोघांचे मृतदेह एक तासाच्या प्रयत्नानंतर तलावातून बाहेर काढले.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘अनकाई’वरील तलावात दोन जण बुडाले appeared first on पुढारी.