जळगांव- अमळनेर तालुक्यातील झाडी येथे (दि. १५) रोजी मध्यरात्री २.३० वाजेला लागलेल्या भीषण आगीत १९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. यात तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील झाडी येथे शिवदास यादव भिल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून शेळी पालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात. घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या. शुक्रवारी १५ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर शिवदास भिल यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळवताच त्यांनी अग्निशमन बंब पाठविलाा. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख, आनंदा झिम्बल यांनी आग विझवली. तोपर्यंत उशिर झाला होता. या आगीत १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. यात शिवदास भिल यांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत मारवड पोलीसांत नोंद घेण्यात येत आहे.
हेही वाचा :
- धक्कादायक ! परप्रांतियांकडून मासेमारीसाठी कीटकनाशकांचा वापर
- Nandurbar News : लाकडांची वाहतूक रोखली म्हणून जमावाचा वनपथकावर हल्ला, महिला वनरक्षक जखमी
- शिरूर लोकसभा मतदारसंघात ही शांतता कसली? उमेदवारीचा तिढा कायम
The post मध्यरात्री झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.