लाल कांदा उत्पादकांवर सरकारकडून अन्याय, शेतकरी संतप्त
मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केवळ पांढऱ्या कांद्यासाठीच निर्यात खुली का केली? लाल कांद्यासाठी का नाही? …