संपूर्ण कांदा निर्यातबंदी हटवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
जानोरी : पुढारी वृत्तसेवा– कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवायला हवी. तेव्हाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडेल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी व प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप यांनी केली आहे. केंद्र सरकारने 99 हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. केंद्र सरकारला हे उशिरा आलेले शहाणपण आहे. या निणर्याचे आम्ही …