मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना ज्यांनी तिलांजली दिली, महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, मित्रपक्ष भाजपशी बेईमानी केली त्यांना आम्हाला गद्दार म्हणावण्याचा काय अधिकार? असा थेट सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामकरणाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. आता न्यायालयालाही गद्दार म्हणणार का? लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या …