नाशिकच्या लासलगावमधून ६०० टन आंब्यांची परदेशवारी
एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या आंब्याच्या हंगामाची भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांनाही प्रतीक्षा असते. दरवर्षी भारतातून विदेशात ५० हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते, त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. यंदा लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात झाली आहे. यातून सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, ३१ जूनपर्यंत एक हजार …