नागरिकांची आकडेमोड, उमेदवारांची झोपमोड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी, निवडणूकीचा फिव्हर तसुभरही कमी झाला नाही. उलट मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा आकडेमोडीला वेग येत आहे. सध्या नाशिकमध्ये पारावर, कट्यावर अन् सोशल मीडियावर ‘कोण किती लीड घेणार’ ही एकच चर्चा रंगत आहे. ही चर्चा कधी मविआचे राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने तर कधी महायुतीचे …
राजाभाऊ वाजे यांनी बजावला मतदानाचा हक्क
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शहरा तसेच ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्तपणे मतदारांचा प्रतिसाद मिळत असून मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत. नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि शांतीगिरी महाराजांमध्ये लढत होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी पथके जिल्ह्यात मतदान प्रक्रियेवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने विविध पथके तैनात केली आहेत. …
प्रचाराचा फ्रायडे ठरला ‘ब्लॉकबस्टर”, बड्या नेत्यांनी गाजविले मैदान
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. २०) होत आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १८) प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने, शुक्रवारी (दि. १७) महायुती व महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी नाशिकमध्ये येत मैदान गाजविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह डॉ. भागवत कराड, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभा, बैठका घेत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न …
मतदान केंद्रांवर वॉटरप्रुफ मंडप, प्रशासनाला पावसाची धास्ती
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जिल्हा प्रशासनाला अवकाळी पावसाच्या धास्तीने ग्रासले आहे. पावसाची शक्यता गृहित धरुन मतदान केंद्रांवर वॉटरप्रुफ मंडपाची उभारण्याची तयारी केली आहे. लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२०) मतदान पार पडणार आहे. राज्यातील पहिल्या चार टप्यात मतदानाचा टक्का घसरल्याने अगोदरच प्रशासन चिंतातूर झाले आहे. पहिल्या चार …
नाशिकमधून हे तीन उमेदवार निवडणूक खर्चात आघाडीवर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व महाआघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी खर्चात आघाडी घेतली आहे. दिंडोरीत युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी पावणेदहा लाखांचे खर्च केल्याचे प्रशासनाच्या लेखी आहे. नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील खर्चाची तपासणी गुरुवारी (दि.९) पार पडली. आयाेगाने नियुक्त केलेल्या खर्च निरीक्षकांपुढे गोडसे यांनी …
नाशिकमधून अखेर गोडसे-वाजे लढत
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यभर सातत्याने चर्चेत राहिलेल्या नाशिक मतदार संघातील महायुती उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ते सलग तिसर्यांदा मतदारांचा कौल आजमावणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत गोडसे यांची प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकची …
महंत शांतिगिरींच्या उमेदवारीने नाशिकच्या आखाड्यात रंगत
[author title=”मिलिंद सजगुरे ” image=”http://”][/author] एकीकडे महायुती उमेदवाराचा घोळ संपत नसताना दुसरीकडे नाशिकमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वेसर्वा महंत शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतदार संघात आपल्या हक्काचे लाखो मतदार असल्याचा दावा करण्यात आल्याने त्यांच्या उमेदवारीचा महायुती अन् महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना फटका बसण्याची तसेच निवडणूक रंगतदार …
मतदान केंद्रांवर महापालिका पुरविणार वैद्यकीय सुविधा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मे महिन्यातील कडक उन्हाचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार महापालिकेने २० मे रोजी शहरातील सर्व २०५ शाळांमधील मतदान केंद्रांवर तसेच ४ जून रोजी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण …
नाशिकमध्ये ‘वंचित’कडून करण गायकर यांना उमेदवारी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहिर केली आहे. पक्षा कडून सोमवारी (दि. २२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणूकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२६) ऊमेदवारी …
ऊन, सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरणार, प्रशासनाला भिती
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाचा वाढता तडाखा आणि सलग सुट्यांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची भीती जिल्हा प्रशासनाला लागली आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुका घेताना वातावरणाचा आढावा तसेच सलग सुट्यांचा हंगाम टाळून कार्यक्रम घ्यावा, अशी विनंतीवजा सूचना प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे करण्यात आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, काही भागांत …