भाजपला देशात हुकूमशाही आणायची आहे : आदित्य ठाकरे
सिडको; पुढारी वृत्तसेवा : नाशिकची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विरुद्ध गद्दार यांच्यात आहे. भाजपला ‘चारशे पार’चा नारा लावून देशात हुकूमशाही आणायची आहे व संविधान बदलायचे आहे, असे सांगत उबाठा गटाचे युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१७) भाजपावर निशाणा साधला. तसेच राज्यातील उद्योग गुजरातला पळवून बेरोजगार युवकांची …