Jayant Patil | कांदाप्रश्नी भाजपकडून महाराष्ट्राची फसवणूक : जयंत पाटील
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कांदा निर्यातबंदी उठवण्याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी धुडकावून लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही गुजरातच्या २ हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीचा निर्णय घेतला. बांगलादेश, श्रीलंका, भुतानला कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचा जुनाच आदेश दाखवत महाराष्ट्राची फसवणूक केली. महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या भाजपला केंद्रातील सत्तेतून हाकलून लावा, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या …