पाणी जपून वापरा! नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद
नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडल्याच्या निर्णयाचे चटके आतापासूनच नाशिककरांना बसत असून, धरणांमधील उपलब्ध पाणीआरक्षणानुसार जुलैअखेर २० दिवसांची तूट येत असल्यामुळे विभागीय महसूल आयुक्तांनी सोमवारी (दि. २२) यासंदर्भात तातडीची बैठक बोलाविली आहे. यात नाशिककरांच्या पाणीवापरावरील निर्बंध अधिक कठोर केले जाण्याची किंबहुना पाणीकपात लादली जाण्याची शक्यता आहे. पाणीकपात टाळण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे. …