टँकर्सने भागवली जिल्ह्यात पावणेसहा लाख लोकसंख्येची तहान
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात एकीकडे लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले असताना तळपत्या उन्हामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणी टँकर्सच्या मागणीत वाढ होत आहे. सद्यस्थितीत एक हजार ५३ गावे-वाड्यांना ३२६ टॅंकर्सद्वारे पाणी पुरविले जात आहे. याद्वारे पाच लाख ७७ हजार १६६ लोकसंख्येची तहान भागविण्यात येत आहे. चालू वर्षी जिल्ह्यात उन्हाचा …