अखेरच्या दिवशी नाशिकमधून २८; दिंडोरीतून १३ अर्ज
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणूकीत शुक्रवारी (दि.३) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. नाशिक मतदारसंघातून २८ तर दिंडोरीमधून १३ ऊमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने ठाकरे गटाचे बंडखोर विजय करंजकर, वंचितेचे करण गायकर व मालती थविल, शांतीगिरी महाराज आदींचा समावेश होता. लोकसभा निवडणूकीत पाचव्या टप्यात २० मे रोजी …