पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा तर शिवरायांचे आज्ञापत्र हाच पर्याय : राम खुर्दळ
नाशिक : नैसर्गिक संसाधने आपली शास्वत संपत्ती आहे, तिच्या ऱ्हासाला स्वार्थी व विकृत मानव कारणीभूत आहे. वाढलेला वनवा, लाकूडतोड, पाण्याचा अपरिमित वापर, उपसा, डोंगर नैसर्गिक टेकड्यांचे अपरिमित उत्खनन, नद्या उपनदयांचे हरवलेले अस्तित्व, जैव विविधतेचा (वन्यजीव पक्षी) होणारा ऱ्हास, तसेच घाट माथ्यांचे ओसाड होणे, उभ्या झाडांवर चालणाऱ्या कुऱ्हाडी यामुळे नैसर्गिक ऋतूचक्र त्याच समतोल हरवून बसले आहे. …