पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद
लासलगाव: पुढारी वृत्तसेवा लासलगावसह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेश्वर धरणामुळे गेल्या २० ते २२ दिवसांपासून लासलगावात नळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही. हक्काचे पाणी मिळण्यासाठी शनिवारी (दि. ११) लासलगावमधील रहिवाशी, व्यवसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. जलवाहिनीत ठिकठिकाणी होत असलेली गळती, वीजपंप नादुरुस्त होणे, वीज पुरवठा खंडित होणे …